महाराष्ट्र

  Download In PDF 

महाराष्ट्राचा भूगोल

             महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली. स्थापनेच्या वेळी महाराष्ट्रात 26 जिल्हे, 235 तालुके, 4 प्रशासकीय विभाग होते.सध्यास्थितीत महाराष्ट्रात 36 जिल्हे, 355 तालुके, 535 शहरे, 43663 खेडी, 6 प्रशासकीय विभाग आहेत.
महाराष्ट्रातील 6 प्रशासकीय विभाग:
  • कोकण (30746 चौ.किमी): मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी/सिंधुदुर्ग.
  • पुणे/प.महाराष्ट्र (57268 चौ.किमी): पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर.
  • नाशिक/खान्देश (574426 चौ.किमी): नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार.
  • औरंगाबाद/मराठवाडा (64822 चौ.किमी): औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, लातूर, नांदेड.
  • अमरावती/प.विदर्भ (46090 चौ.किमी): अमरावती, बुलढाणा, अकोला, यवतमाळ, वाशिम.
  • नागपूर/पूर्व.विदर्भ (51336 चौ.किमी): नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया.
नैसर्गिक सीमा :
  • वायव्येस : सातमाळा डोंगररांगा, गाळणा टेकड्या व सातपुडा पर्वतातील अक्राणी टेकड्या.
  • उत्तरेस : सातपुडा पर्वतरांगा व त्याचा पूर्वेस गाविलगड टेकड्या.
  • ईशान्येस : दरेकासा टेकड्या.
  • पूर्वेस : चिरोळी टेकड्या व भामरागड डोंगर.
  • दक्षिणेस : हिरण्यकेशी नदी व कोकणातील तेरेखोल नदी.
  • पश्चिमेस : अरबी समुद्र.
राजकीय सीमा व सरहद्द :
  • वायव्येस : गुजरात व दादरा नगर हवेली.
  • उत्तरेस : मध्यप्रदेश.
  • पूर्वेस : छत्तीसगड.
  • आग्नेयेस : आंध्र प्रदेश.
  • दक्षिणेस : कर्नाटक व गोवा.
राज्य व त्यांना जोडणारे महाराष्ट्रातील जिल्हे :
  • गुजरात : पालघर, नाशिक, नंदुरबार, धुळे
  • दादर नगर हवेली : ठाणे, नाशिक
  • मध्ये प्रदेश : नंदुरबार, धुले, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपुर, भंडारा, गोंदिया
  • छत्तीसगड : गोंदिया, गडचिरोली
  • आंध्रप्रदेश : गडचिरोली, चंद्रपुर, यवतमाळ, नांदेड
  • गोवा : सिंधुदुर्ग

महाराष्ट्राचे भारतातील स्थान :
भारतातील 29 राज्यांपैकी एक.
भारताच्या मध्यवर्ती भागात .
महाराष्ट्र राज्य ही उत्तर भारत व दक्षिण भारतात एकत्र आणणारी विशाल भूमी आहे
1. विस्तार
  • अक्षांक : 15° 41’ उत्तर अक्षवृत्त ते 22° 6’ उत्तर अक्षवृत्त.
  • रेखांश : 72° 36’ पूर्व रेखांश ते 80° 54’ पूर्व रेखावृत्त.
2. आकार
  • व्हीव्हीत्रिकोणाकृती, दक्षिणेस चिंचोळा तर उत्तरेस रुंद.
  • पाया कोकणात व निमुळते टोक विदर्भात.
3. लांबी, रुंदी व क्षेत्रफळ
  • लांबी = पूर्व पश्चिम – 800 किमी.
  • रुंदी = दक्षिण उत्तर – 720 किमी.
  • क्षेत्रफळ = 307713 चौ.किमी.
  • क्षेत्रफळाच्या द्रुष्टीने भारतात राजस्थान, मध्यप्रदेश नंतर महाराष्ट्रचा 3 रा क्रमांक लागतो.
  • महाराष्ट्राने देशाचा 9.36% भाग व्यापला आहे.
  • समुद्रकिनारा 720 किमी. लांबीचा आहे.
जिल्हे निर्मिती :
  • 1 मे 1981 : रत्नागिरीपासून सिंधुदुर्ग (27 वा जिल्हा)
    औरंगाबादपासून जालना (28 वा जिल्हा)
  • 16 ऑगस्ट 1982 : उस्मानाबादपासून लातूर (29 वा जिल्हा),
  • 26 ऑगस्ट 1982 : चंद्रपूरपासून गडचिरोली (30 वा जिल्हा)
  • 1990 : मुंबईपासून मुंबई उपनगर (31 वा जिल्हा)
  • 1 जुलै 1998 : धुळेपासून नंदुरबार (32 वा जिल्हा)
    अकोल्यापासून वाशिम (33 वा जिल्हा)
  • 1 मे 1999 : परभणीपासून हिंगोली (34 वा जिल्हा)
    भंडारा  गोंदिया (35 वा जिल्हा)
  • 1 ऑगस्ट 2014 : ठाण्यापासून पालघर (36 वा जिल्हा)
.
महाराष्ट्राची सामान्य माहिती

* महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर- कळसुबाई (१६४६ मी.) ता. अकोले, जि. अहमदनगर.

*
महाराष्ट्राला ७२० कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे.

*
महाराष्ट्राची राजधानी - मुंबई * उपराजधानी - नागपूर.

*
महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या - ३५.

*
महाराष्ट्राने भारताचा ९.७ टक्के भाग व्यापलेला आहे.

*
महाराष्ट्राच्या वायव्य भागात गुजरात राज्य व दादरा-नगर हवेलीच्या सीमारेषा आहे.

*
महाराष्ट्रास लागून मध्य प्रदेश राज्याची सीमा सर्वात लांब आहे.

*
महाराष्ट्रात कोकण प्रदेश उत्तरेकडे डहाणूपर्यंत तर दक्षिणेकडे तेरेखोल खाडीपर्यंत आहे * विदर्भातील तलाव मालगुजारी नावाने ओळखले जातात.

*
विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात मोठय़ा संख्येने तलाव आहे.

*
महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात मासेमारी रत्नागिरी जिल्ह्यात चालते.

*
महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा गोंदिया आहे, तर शहर ठाणे आहे.

*
महाराष्ट्राचे पठार बेसॉल्ट या खडकाने बनलेले आहे.

*
महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला सह्याद्री म्हणून ओळखतात.

*
महाराष्ट्रातील मुंबई जिल्हा आकाराने लहान पण लोकसंख्येने मोठा आहे

*
महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे.

*
महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे.

*
महाराष्ट्रातील १०० टक्के साक्षर जिल्हा- सिंधुदुर्ग, तालुका पन्हाळा.

*
महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला प्रथम जिल्हा- वर्धा.

*
महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर, जिल्हा नगर.

*
भारतात सर्वात जास्त कापड गिरण्या महाराष्ट्रात आहे.

*
भारतात सर्वात जास्त विद्युत निर्मिती महाराष्ट्रात होते.

*
महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना नाशिक येथे आहे.

*
महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा अहमदनगर.

*
भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा रायगड जिल्ह्यात आहे.

*
महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस आंबोली (सिंधुदुर्ग) येथे पडतो.

*
पंढरपूर शहर भीमा नदीकाठी आहे. महाराष्ट्राची काशी म्हणतात.

*
गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात.

*
प्रवरा नदीच्या खोऱ्यात उसाचे पीक मोठय़ा प्रमाणात घेतले जाते.

*
गरम पाण्याचे झरे ठाणे जिल्ह्यात वज्रेश्वरी येथे आहेत.

*
जगप्रसिद्ध लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे.

*
औरंगाबाद शहर बावन्न दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते.

*
पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहर बटाटय़ाच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे.

*
महाराष्ट्रातील नायकवाडी प्रकल्पाला नाथसागर म्हणतात.

*
कोयना प्रकल्पावर वीज निर्मिती केली जाते म्हणून महाराष्ट्राची भाग्य लक्ष्मी असे म्हणतात.

*
कोयना धरणाच्या जलाशयाला शिवाजी सागर म्हणतात.

*
विदर्भातील नंदनवन असे चिखलदरा थंड हवेच्या ठिकाणाला म्हणतात.

*
विदर्भातील कॅलिफोर्नियाचा असे वरुड व चांदूरबाजार तालुक्याला म्हणतात. कारण तेथे जास्तीत जास्त संत्रा पिकविला जातो.

*
महाराष्ट्रातील कापसासाठी प्रसिद्ध बाजारपेठ अमरावती येथे आहे.

*
विदर्भातील प्रसिद्ध आनंद सागर शेगाव येथे आहे.

*
संत गजानन महाराजांची समाधी शेगाव जि. बुलढाणा येथे आहे.

*
संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती येथे आहे.

*
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी मोझरी, जि. अमरावती येथे आहे.

*
संत गाडगेबाबांची समाधी अमरावती येथे आहे.

*
ब्रह्मदेशाच्या थिबा राजाचा राजवाडा रत्नागिरी येथे आहे.

*
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथे आहे.

*
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे आहे.

*
महाराष्ट्र राज्यात तोफखाना प्रशिक्षण शाळा देवळाली, जि. नाशिक.

*
पुणे ही पेशव्यांची राजधानी आहे.

*
कोल्हापूर येथे देशातील गुळाची बाजारपेठ आहे.

*
आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म शिरढोण, जि. रायगड येथे झाला.

*
मुंबई शहराला भारताचे पॅरिस असे म्हणतात.

*
यशवंतराव चव्हाणांच्या समाधी स्थळास प्रीतीसंगम असे म्हणतात.

*
महाराष्ट्र पोलीस अॅकॅडमी नाशिक येथे आहे.

*
नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला येथे आहे.

*
महात्मा गांधीजींचा सेवाग्राम आश्रम व विनोबा भावेंचा पवनार आश्रम वर्धा जिल्ह्यात आहे.

*
शिखांची दक्षिण काशी म्हणून नांदेड शहर प्रसिद्धी आहे.

*
महाराष्ट्रात नाशिक येथे कुंभमेळा भरतो.

*
शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी येथे आहे.

*
ज्ञानेश्वरांनी नेवासे या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली.

*
तारापूर हे भारतातील पहिले अणुशक्ती केंद्र आहे.

*
भारतातील पहिला पेट्रो रसायन प्रकल्प तुर्भे या ठिकाणी आहे.

*
महाराष्ट्रातील सर्वात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा ठाणे.

*
रायगड जिल्ह्यात- कातकरी, ठाणे जिल्ह्यात- वारली, यवतमाळ जिल्ह्यात- कोलाम या आदिवासी जमाती प्रामुख्याने आढळतात.

*
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मस्थान भगूर जि. नाशिक.

*
कवी केशवसुतांचे स्मारक भालगुंड रत्नागिरी जिल्ह्यात आहे.

*
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ राज्यातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग आहे.

*
बॉम्बे हाय तेल उत्खननासाठी प्रसिद्ध आहे. मुंबईपासून २४० कि.मी. अंतरावर आहे.

*
महाराष्ट्रात चुनखडीचे साठे यवतमाळ जिल्ह्यात आढळतात.

*
महाराष्ट्रातील उत्तर - सीमेला सातपुडा पर्वतांची रांग आहे.

*
वाघांसाठी प्रसिद्ध असलेले मेळघाट अभयारण्य सातपुडा पर्वतात आहे.

*
नाशिक जिल्ह्यातील गंगापूर हे महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण आहे.

*
सोलापूर जिल्ह्याला ज्वारीचे कोठार म्हणतात.

*
महाराष्ट्राचे मँचेस्टर असे इचलकरंजी शहरास म्हणतात.

*
कालिदासाने मेघदूत काव्य रामटेक येथे लिहिले.

*
कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक, जि. नागपूर येथे आहे.

*
भारतातील तिसरे व महाराष्ट्रातील पहिले पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर येथे आहे.

*
सुप्रसिद्ध अजिंक्यतारा किल्ला सातारा जिल्ह्यात आहे. हा किल्ला शिलाहार वंशातील राजा दुसरा भोज याने बांधला.

*
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ लोणेरे (रायगड) येथे आहे.

*
फिल्म अॅड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट पुणे येथे आहे.

*
महाराष्ट्रातील बालकामगारविरोधी मोहिमेसाठी ब्रॅड अॅम्बेसिडर म्हणून शासनाने शाहरूख खानची निवड केली.

*
माहितीच्या अधिकाऱ्याच्या कायद्याची अंमलबजावणी करण्यात महाराष्ट्र हे राज्य मिलेनियर ठरले आहे, मराठवाडय़ातील औरंगाबाद येथे राष्ट्रीय विधी विद्यापीठ स्थापन होणार आहे.

*
थेट परकीय गुंतवणुकीत राज्याचा गुजरातनंतर दुसरा क्रमांक लागतो.

*
रोजगार निर्मितीमध्ये महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक आहे.

*
भारतातील परकीय गुंतवणुकीस महाराष्ट्राचा हिस्सा २४ टक्के आहे. (मार्च २००९)

*
महाराष्ट्रावर २००२-०३ मध्ये ८२ हजार ५४९ कोटी रुपयांचे कर्ज, २००६-०७ मध्ये १ लाख ३४ हजार ४९३ कोटींवर गेले तर २००७-०८ मध्ये १ लाख ४४ हजार ३२५ कोटींच्या आसपास कर्ज होते.

महाराष्ट्रची कोकण किनारपट्टी :

स्थान : महराष्ट्र अरबी समुद्र व सह्याद्रि पर्वत यांच्या दरम्यान दक्षिणोत्तर लांब पट्टयास कोकणम्हणतात.
विस्तार : उत्तरेस दमानगंगा नदीपासून दक्षिणेस तेरेखोल खाडीपर्यंत.कोकण किनारपट्टी रियाप्रकारची आहे.
लांबी: दक्षिणोत्तर = 720 किमी, रुंदी =सरासरी 30 ते 60 किमी .
उत्तर भागात ही रुंदी 90 ते 95 किमी.तर दक्षिण भागात ही रुंदी 40 ते 45 किमी.
क्षेत्रफळ : 30,394 चौ.किमी.
  • कोकण प्रदेश हा सलग मैदानी नाही. हा भाग डोंगर दर्‍यांनी व्यापलेला आहे. परंतु कमी उंचीचा सखल भाग आहे.
  • किनार्‍य पासून पूर्वीकडे सखल भागाची समुद्र सपाटीपासून ऊंची सुमारे 15 मीटर इतकीच आहे.
  • कींनार्‍यापासून पूर्वीकडे सह्याद्रीच्या पायथ्याशी ही ऊंची सुमारे 250 मी. पर्यंतच वाढते.
  • उतार पूर्व-पश्चिम दिशेस मंदस्वरूपाचा आहे.
  • या प्रदेशात समुद्राकडील बाजूस सागरी लाटांच्या खणन कार्याने व संचयन कार्याने वेगवेगळ्या प्रकारची तयार झालेली भुरुपेआढळतात.
  • उदा . सागरी गुहा, स्तंभ, आखाते, पुळणे, वाळूचे दांडे इ.
  • कोकणचे उपविभाग :
  • 1.उत्तर कोकणठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड.
  • हा भाग सखल, सपाट, व कमी अबडधोबड आहे.
  • ओद्योगिकदृष्ट्या प्रगत.
  • लोकसंख्येची घनता अधिक.
  • नागरी लोकसंख्या जास्त.
  • दक्षिण कोकणरत्नागिरी, सिंधुदुर्ग
  • हा भाग खडकाळ व अबडधोबड आहे.
  • ओद्योंगिकदृष्ट्या अप्रगत.
  • लोकसंख्येची घनता कमी.
  • पारंपरिक व्यवसाय.
  • खनिज संपत्तीच्या दृष्टीने महत्वाचे.
समुद्रसपाटीपासूनच्या उंचींनुसार कोकणचे आणखी दोन भाग पडतात.
1. खलाटी(पश्चिम कोकण) : समुद्र किनार्‍याला लागून असलेला कमी उंचीचा प्रदेश म्हणजे खलाटीहोय. या भागात गालाची चिंचोळी मैदाने आढळतात.
या भागात मोठया प्रमाणात नारळाच्या बागा आहेत.
2. वलाटी(पूर्व कोकण) : खलाटीच्या पूर्वेस असलेल्या सह्याद्रीच्या पायथ्यापर्यंतचा कमी-अधिक उंचीच्या डोंगराळ व टेकड्यांनी व्यापलेल्या तुलनात्मक उंच प्रदेश
म्हणजेच वलाटीहोय. हा भाग फलोत्पादांनाच्या दृष्टीने महत्वाचा ठरतो. डोंगर उतारवर भाताचे पीक घेतले जाते.
कोकणातील विविध प्रकृतीक भुरुपे
1. खाडी : भारतीचे पाणी नदीच्या मुखात जेथपर्यंत आत शिरते त्या भागाला खाडी म्हणतात.
     ठाणे : दाटीवरे, डहाणू, वसई, मनोरी, व ठाणे
मुंबई उपनगर : मालाड, माहीम
मुंबई : माहीम
रायगड : पनवे, उरण, धरमतर, रोहा, राजापुरी, बाणकोट
रत्नागिरी : दाभोळ, जयगड, विजयदुर्ग
सिंधुदुर्ग : देवगड, कालवली, कर्ली, तेरेखोल
2. पुळनी : समुद्र किनार्‍याजवळ सागरी लाटांच्या संचयन कार्यामुळे उथळ कींनार्‍यावर तयार होणार्‍या वाळूच्या पट्टयाना पुळनअसे म्हणतात.
मुंबई उपनगर : जिहू बीच
मुंबई शहर
दादर, गिरगाव
रत्नागिरी : गणपतीपुळे, हर्न, गुहागर
सिंधुदुर्ग : मालवनजवळ तरकर्ली, शिरोड, दापोली, उमादा
रायगड : अलिबाग, मुरुड-जंजिरा, श्रीवर्धन
3. वाळूचे दांडे : सागरी लाटांमुळे उथळ कींनार्‍यावर वाळूचे दांडेतयार होतात.
खरदांडा(रायगड)
4. बेटे : मुंबई : मुंबई बेट
रायगड : धारपूरी (एलिफंटा केव्ह)
अलिबाग : खांदेरी, उंदेरी
सिंधुदुर्ग : कुरटे (सिंधुदुर्ग किल्ला)
मुंबई उपनगर : साष्टी, अंजदिव
5. बंदरे : महाराष्ट्राच्या किनारपट्टीला लहानमोठे 49 बंदरे आहेत.
मुंबई = मुंबई, ठाणे = अलिबाग, न्हावाशेवा(JNPT),
रत्नागिरी = हर्न, जयगड = रत्नागिरी ,
सिंधुदुर्ग = मालवण, वेंगुले, रेड्डी
6. खनिजेबॉक्साईट = ठाणे,
म्यंगेणीज = सिंधदुर्ग,
क्रोंमाईत = सिंधुदुर्ग, रत्नागिरी, लोह व
जिप्सम = रत्नागिरी
7. नद्या : ठाणे : दमनगंगा, सूर्या, तानसा, वैतरणा, काळू, पिंजाल, भारसाई, उल्हास, मुरबाडी,
मध्य प्रदेश : पताळगंगा, आंबा, कुंडलिका, काळ, सावित्री, वाशिष्ठी, शास्त्री
दक्षिण कोकण : काजवी, मुचकुंदी, वाघोटने, शुक, गड, कर्ली, तेरेखोल.
जास्त लांबी- वैतरणा, व उल्हास मुखाजवळ प्रवाह किनार्‍यास समांतर. कारण, ‘डोंगरांच्या रांगा
8. किल्ले : जिल्हे डोंगरी किल्ले व  सागरी किल्ले
ठाणे वसूली, माहुली, भंडारगड, पळसगड अर्नाळा
रायगड कर्नाळा, शिवथर, माळांगगड, रायगड जंजिरा
रत्नागिरी जयगड, फत्तेगड, पुर्नगड, कानकदुर्ग सुवर्नदुर्ग
सिंधुदुर्ग रांगना, देवगड, भगवंतगड, मनोहारगड, सिंधुदुर्ग विजयदुर्ग
भारतगड, पधगड सजैकोत
Image result for update gif

No comments:

Post a Comment